Complete Novel - Madhurani CH-60 शेवटचा डाव (समाप्त)
इतरत्र परिस्थीती आवाक्याबाहेर जरी गेली असली तरी गणेशरावने आपल्या साथीदारांच्या मदतीने लोकांना स्टेजकडे जाण्यास रोकले होते. तरीही गणेशराव आणि त्यांच्या साथीदारांची त्या लाल दिवटे बांधलेल्या लोकांशी चकमक अजुनही सुरुच होती. त्या लोकांशी चार हात करता करता, गणेशचे पटांगणात जिकडे त्याने त्याचे तिन खास जवळचे सहकारी मधुकररावची खबर घेण्यास पाठवले होते, त्या बाजुला लक्ष होते. तसे मधुकराव आणि ते पाठवलेले तिन्ही साथीदार गणेशराव ज्या जागेवर होते तेथून दिसत नव्हते. ते त्यांच्यावर दिलेलं काम फत्ते करतील याची गणेशरावला खात्री होती. पण बराच वेळ झाला तरी ते अजून दिसत नव्हते. गणेशरावला काळजी वाटू लागली.
की मधुकररावने त्यांचाच काटा काढला..
नाना प्रकारच्या शंका गणेशच्या डोक्यात येत होत्या. तेवढ्यात गणेशरावला ते तिघेही त्यांच्याकडे परत येतांना दिसले. त्यांच्या चालीत एक जोम होता आणि चेहऱ्यावर विजयी हास्य होते. म्हणजे त्यांनी सोपविलेले काम फत्ते केलेले दिसत होते. गणेशरावांच्या चेहऱ्यावरही हास्य तरळू लागले. ते आता त्यांचे साथीदार त्यांच्या जवळ येवून ती खबर त्यांच्याकडून एकण्यास उत्सुक होते. ती खबर एकण्यात जो एक आनंद होता तो त्यांना गमवायचा नव्हता. एव्हाना ते तिघे येवून गणेशरावच्या मागे उभे राहाले. गणेशराव आता वळून त्यांच्याकडून ती खबर एकणार तेवढ्यात त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजुवर काठीचा एक जबरदस्त दणका बसला. गणेशराव घेरी येवूनच पडले. गणेशरावांनी पडल्या पडल्या डोळे उघडून पाहाले तर त्यांच्या लक्षात आलेकी त्यांच्या साथीदारांपैकी बिंबानेच तो वार केला होता. त्यांनी आश्चर्याने त्यांच्या बाकी दोन साथीदारांकडे पाहाले. ते त्यांच्याकडे पाहून कुत्सीतपणे हसत होते आणि पुढचा वार करण्यास तयार होते. तेवढ्यात पुढील वार त्यांच्या कपाळावर करण्यात आला. यावेळी तो वार त्यांच्या विश्वासू साथीदार राजुने केला होता.
एव्हाना गणेशरावांच्या लक्षात आले की त्यांचा विश्वासघात झालेला होता...
पण का?... आणि कसा?...
कळायला काही मार्ग नव्हता.
नंतर एकामागुन एक काठीचे वार त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, पोटावर होत होते. वार करणारे ते तिघेच होते... त्यांचे विश्वासू सहकारी. त्या तिघांनी झोडून झोडून गणेशरावांना अर्धमेलें केलं होतं. तेवढ्यात लाल दिवटेवाल्यांच्या एक मोठा लोंढा तिकडे येतांना दिसताच त्या तिघांनी काढता पाय घेतला. खाली पडलेल्या गणेशचे अनायसेच लक्ष तिकडे स्टेजच्या बाजूला गेले. लोकांच्या गर्दीतून वाचवत चारपाच कार्यर्कत्यांनी मधुराणीला तिच्या गाडीजवळ आणले होते. त्यात मधूकरावही होते. ते लोक पटापट गाडीत बसले. मधूकररावची आणि गणेशरावची नजरानजर झाली. मधूकरराव त्याच्याकडे पाहून गुढपणे हसले. मग मधूकरराव मधूराणीशी गणेशरावांकडे बोट दाखवत काहीतरी बोलले.
मधुराणीची आणि गणेशरावची नजरा नजर झाली.
म्हणजे हे जे केले ते मधूकररावने आणि त्यात मधूराणीचीही संम्मती होती...
पण का?... व ... कसे?...
तेवढ्यात गणेशरावला मधूकररावच्या गळ्यात त्यांनी त्याच्या त्या तिन साथीदारांच्या स्वाधीन केलेली ती स्वत:ची सोन्याची चैन दिसली.
अच्छा तर ते असं झालं..... .......
गणेशरावला आता एक एक गोष्ट स्पष्ट होवू लागली होती. गणेशरावच्या तिन साथीदाराने त्याच्याकडे येवून ती बातमी देणं म्हणजे तो एक मधूकरावाच्या डावाचाच भाग असावा.... की जेणेकरुन गणेशरावने त्याच्यावर वार करावा. आणि तसेच झाले. आणि जेव्हा गणेशराव मधूकराववर वार करायला गेले ते मधूकरावने मधूराणीच्या निर्दशनास आणून देले असावे. पुरावा म्हणून त्यांच्याजवळ त्याची चेन आणि अंगठ्या होत्याच. आणि मधूराणीला जेव्हा खात्री झाली की गणेशराव आपल्याला अंधारात ठेवून येवढं मोठं पाऊल उचलू शकतो, म्हणजे तो माणूस धोकादायक आहे. मग मधूकरावने गणेशरावचाच काटा काढण्याची परवानगी मधूराणीला माघीतली असेल आणि ती मधूराणीने त्याला दिली असणार.
तरीही गणेशरावच्या मनात मधूराणीबद्दल एक खोटी आशा डोकावली...
ती आता आपल्यालाही नेण्याची व्यवस्था करेल... .
तो जाण्यासाठी तयारच होता.
पण ती नजर आता त्याला ओळखत नव्हती...
ती नजर भेदरलेलीही नव्हती...
एवढा सगळा हिंसाचार चाललेला पाहून त्या नजरेत भीतीही नव्हती...
दु:ख ही नव्हते... कीवही नव्हती...
त्या नजरेत होती एक महत्वाकांक्षा...
वाटेत जेही येतील त्यांना वेळ आल्यास तुडवून जाण्याची जिद्द..
तिने बघून न बघितल्यासारखे करून दुसरीकडे नजर फिरविली आणि गाडी तिथून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आदेश दिला. गाडी सुरु होऊन ते तेथून पसार सुध्दा झाले. गणेशराव बघतच राहाले. गणेशरावच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचे बाकीचे कार्यकर्ते अजूनही मधुराणी स्टेजवर आहे असं समजून त्या लोकांशी लढा देत होते.
म्हणजे ह्या सगळ्यांना मरायला सोडून मधुराणीने पळ काढला होता...
आणि हे सगळे मुर्खासारखे लढत होते ...
गणेशराव अजूनही खाली पडल्या पडल्या धडपडत होते. आता मधुराणीसाठी नाही तर स्वत:चा जीव वाचविण्यासाठी. तेवढ्यात अचानक एक लोकांचा ओंढा गणेशरावकडे आला. ते लोक संख्येने एवढे जास्त होते की गणेशरावला काहीच करता आले नाही. ते लोक अक्षरश: गणेशरावला चिरडून पुढे निघून गेले. मग एकानंतर एक असे लोक त्यांना तुडवत होते. त्यांचा आक्रोश एवढ्या गोंधळात कुणालाही ऐकू येत नव्हता.
लोकांचा लोंढा गणेशरावला तुडवून जाऊन आता ओसरला होता. पण त्यांचा एकही अवयव शाबूत राहिला नव्हता. हललं तरीसुध्दा असह्य वेदना होत होत्या. त्यांनी तसंच पडलेल्या अवस्थेत आजुबाजूला एक नजर फिरविली. त्या उठलेल्या मोहोळाच्या माश्या अजूनही लोकांना चावत होत्या. लोक त्या माशांना आपल्या शरीरावरून ओरबडून चिरडून मारुन टाकण्याचा प्रयत्न करीत. त्यात बऱ्याच माशा मेल्या होत्या.
कामगार माश्याच त्या...
त्यांचं कर्तव्य होतं आपल्या राणी माशीचं सरंक्षण करणे....
गणेशरावला आता आपले प्राण पाखरु उडण्याचीच वाट होती. नव्हे त्यांना आता त्यांचे प्राणपाखरु उडण्याची घाई झाली होती. कारण प्राण गेले म्हणजे त्यांची होणाऱ्या असह्य वेदनेतून सुटका तरी होणार होती. अचानक त्यांची नजर आकाशाकडे गेली. आकाशात त्या आंब्यावरच्या मोहोळातली राणी मधमाशी आपल्या सोबत काही नर मधमाशांना आणि काही कामगार माश्यांना घेऊन पुर्वेकडे निघाली होती. नव्या जागेच्या शोधात. आणि ती जात आहे या गोष्टीपासून अनभिज्ञ इथे खाली तिचे काही कामगार साथी अजूनही शर्थीने लढत होते- या मधूराणीच्या कार्यकर्त्यांसारखेच.
गणेशरावने एकदा शेवटची नजर आजूबाजूला फिरविली. त्यांचे साथीदार अजूनही काही जण मरत होते तर काही जण लढत होते. गणेशरावने विचार केला.
हा प्रत्येकजण इथे मरत आहे तो कामगार माशीचे मरण मरत होता...
त्याही परिस्थीतीत गणेशरावांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची चुणूक उमटून गेली. त्यांना या गोष्टीचे समाधान होते की त्यांच्या आजुबाजुचे मधूराणीचे कार्यकर्ते जे मरण पत्करत होते ते कामगार मधमाशीचं.. पण त्यांना जे मरण मिळत होतं ते एका नर मधमाशीचं ...
समाप्त
The end
Anybody interested to volunteer to translate this novel in English may contact me at - marathinovel@gmail.com