... हिमालयातील डोंगराच्या पायथ्याशी वाहणाऱ्या नदीच्या काठावर असलेल्या गुहेत अजूनही तो ऋषी ध्यानमग्न अवस्थेत होता. अचानक त्याने आपले डोळे उघडले. त्याचे डोळे एखाद्या ज्वालेप्रमाणे आग ओकीत होते. हळू हळू त्याच्या डोळ्यातली लाली नाहीशी होऊन आपसूकच ते पुन्हा मिटले. पुन्हा त्याच्या जाणीवेच्या कक्षा स्थल, काळ आणि वेळेच्या सर्व मर्यादा ओलांडून मुक्त विचरण करू लागल्या.
एका जंगलात एक पर्णकुटी होती. पर्णकुटीसमोर अंगणात तिघेजण बसलेले होते. ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांनी त्यांच्यासमोर छोट्या छोट्या काड्यांचे छोटे छोटे ढीग केले होते. एका ढिगातल्या काड्या काढून दुसऱ्या ढिगात टाकायच्या किंवा एका ढिगातल्या काड्या काढून त्याचा दुसरा एक छोटा ढीग बनवायचा. असे करीत असतांनाच ते आपाआपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या चर्चेवरून तरी असे जाणवत होते की ते काहीतरी त्यांच्या अडचणीबाबत बोलत असावेत. तेवढ्यात त्यांच्यामागून तो ऋषी आला. त्याची चाहूल लागताच ते तिघेही मागे वळून त्याच्याकडे बघू लागले.
ऋषीने आपली नजर तिघांवरून फिरवीली.
" मला माहित आहे तुम्ही कुठे अडला आहात " ऋषी गूढपणे त्यांना म्हणाला.
तिघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याच्या छटा पसरल्या.
आपण कुठे अडलो आहोत हे या ऋषीला कसे कळले?...
ते काही बोलणार त्याच्या आधीच तो ऋषी पुन्हा मार्गक्रमण करीत त्यांच्या जवळून पुढे निघून गेला. ते त्या ऋषीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघू लागले.
ऋषी एकदम थबकला आणि त्यांच्याकडे वळून म्हणाला, " काळजी करू नका. मी तुम्हाला तुमच्या विवंचनेतून लवकरच सोडवीन "
तो ऋषी पुन्हा वळून आपले मार्गक्रमण करू लागला. ते तिघेही आ वासून आश्चर्याने त्या ऋषीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती नाहीशी होईपर्यंंत पाहत राहिले ...
... to be contd..





2 comments: